Posts

शरीरातील रक्त वाढविण्यासाठी घरगुती उपाय

Image
  तुमच्या शरीरात जर रक्त किंवा हिमोग्लोबिन चे प्रमाण कमी झाले तर त्याचे एक न अनेक दुष्परिणाम आहेत. शरीरातील रक्त किंवा हिमोग्लोबिन कमी झाल्यास थकवा लागणे, अशक्त पणा जाणवणे यांसारखे काहींच्या त्वचेवर काही परिणाम आढळून येतात, तर काही जणांचे विशेषतः प्रौढांचे हात पाय सुजण्यासारखे परिणाम होतात.या शरीरावरील दुष्परिणामा सोबतच  एनिमिया सारखे रोग देखील होऊ शकतात. रक्तवाढीसाठी किंवा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी संतुलित आहारा बरोबरच काय खावे व काही घरगुती उपाय पुढीलप्रमाणे  मोड आलेले कडधान्य खाणे - रक्त वाढवणे एक उत्तम उपाय  मोड आलेली मटकी, हुलगे, चवली या रोज कडधान्य तुमच्या आहारात असायला हवेत. यामुळे शरीरातील रक्ताचे किंवा हिमोग्लोबिन प्रमाण वाढवण्यास मदत होते. आहारात टोमॅॅटो चा समावेश  दिवसेंदिवस आहारात टोमॅॅटो चा समावेश देखील होतो. लवकर रिझल्ट पाहिजे असल्यास टोमॅॅटो चा सूप किंवा ज्यूस रोज प्या. टोमॅॅटोमध्ये व्हिटॅॅमिन सी जे रक्त विकास अत्यंत गुणकारी असते.

मणक्याच्या आजारावर आयुर्वेदिक घरगुती उपाय | मणक्यातील गॅॅप

Image
           मणका आजारावर घरगुती उपाय पट्टा बसविणे, व्यायाम करणे, लांबचा प्रवास टाळणे, वेदना कमी करण्यासाठी प्रयत्न पुर्वक आपण आपल्याकडे असणारी लक्षणे कारणे त्यावर करता येणारी योग्य उपचार पद्धती यासाठी आपल्याला योग्य अशी घरगुती आयुर्वेदिक उपचारासाठी पद्धत अवलंबून वेदना दूर करता याव्यात. मणक्याचे आजार व आयुर्वेदिक उपचार   * मणक्याच्या आजाराची कारणे :-             मणक्याचा आजार उद्धवल्यास सतत वेदनादायक प्रवास होत असतो मुख्य लक्षण म्हणजे मणक्यांची झीज होणे होय. मणक्यांची झीज जास्त होत राहतील तितकी लक्षणे मोठ्या प्रमाणात वाढत राहतात.  मणक्याच्या आजाराची कारणे :-  १) व्यायामाची आवड नसेल किंवा व्यायाम करण्यासाठी योग्य वेळ मिळत नसेल तसेच तुम्हांला व्यायामाचा कंटाळा, अभाव.  २) कोणतेही बैठे काम करताना तुम्ही नीट बसत नसताल तर.  ३) तुम्ही मांडी घालून बसला असताल किंवा तुम्हांला खुर्चीत बसायची सवय असेल तर तुम्ही पुढे वाकून बसण्याची सवय असेल तरीही आजार होऊ शकतो.  ४) तुम्ही कामानिमित्त चालताना पाठ सरळ न ...

कांजण्या आजार म्हणजे काय व कांजण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार

Image
          कांजण्या म्हणजे काय :- कांजण्या हा विषाणूपासून होणारा एक संसर्गजन्य आजार आहे. कांजण्या आजारास (चिकनपाॅॅक्स) किंवा व्हॅॅरिसेला या नावानेही ओळखला जातो. कांजण्या आजाराची लागण ही प्रामुख्याने लहान मुलांमध्ये अधिक झालेली आढळते. या आजारात शरीरावर खाज सुटणारे लालसर फोड येत असतात. कांजण्या का व कशामुळे होतात, कांजण्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपचार अशी कांजण्या या रोगाची सर्व माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी या लेखात दिली आहे.  कांजण्या या रोगाची कारणे :- कांजण्या आजार हा व्हारसमुळे होतो. व्हॅॅरिसेला-झोस्टर व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे कांजण्या आजाराचा संसर्ग होत असतो. याशिवाय कांजण्या असलेल्या व्यक्तीकडून याची लागण दुसऱ्याला होऊ शकते. अशाप्रकारे कांजण्या आजार होत असतो.  कांजण्या रोग कसा पसरतो ?              कांजण्या हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होत असते. कांजण्याची लागण झालेल्या रुग्णाच्या खोकला, शिंका, लाळ,रुग्णाचे दुषित कपडे किंवा रुग्णाच्या अंगावरील फुटलेल्या फोडा...

फक्त गर्भधारणेमुळेच नाही तर 'या' कारणांमुळे देखील अनियमित होऊ शकते मासिक पाळी !

Image
              मासिक पाळीशी निगडीत असणारी प्रत्येक गोष्टी थेट स्त्रीच्या आरोग्यावर परिणाम करते. त्यामुळे मासिक पाळीबाबत संपूर्ण स्त्रीला माहित असणे अत्यंत गरजेचे असते. कारण जर तुमची मासिक पाळी अनियमित झाली किंवा एखाद वेळी चुकली तर तुम्ही गरोदरच आहात असा त्याचा अर्थ मुळीच होत नाही. तर त्यामागे असतात ही काही कारणे, जाणून घ्या कोणती!                  कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यात एका विशिष्ट वयानंतर मासिक पाळी महत्वपूर्ण स्थान घेते. ही मासिक पाळी वेळेत आली आणि वेळेत संपली कि स्त्रीला कोणतही टेन्शन राहता नाही. पण जेव्हा मासिक पाळी येत नाही तेव्हा मात्र ती गोष्ट जास्त चिंतेची असू शकते. आपल्याकडे असा समाज रूढ झाला आहे कि मासिक पाळी ही तेव्हाच थांबते जेव्हा स्त्री गरोदर असते. त्यामुळे जर स्त्रीचा संभोग झाला असेल, पण सारं काही सुरक्षित होऊनही जर मासिक पाळी थांबली तरी सुद्धा आपण गरोदर असल्याची भीती स्त्रीच्या मनात दाटते.                पण तुम्हाला माहित हा आहे का मासिक पाळी थ...

गायीच्या दुधामुळे वाढते रोगप्रतिकारक शक्ती, जाणून घ्या अन्य फायदे

Image
गायीचे दुध डेअरीच्या दुधाच्या तुलनेत शुद्ध आणि पौष्टिक असते. गायीच्या दुधामुळे आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात आरोग्यदायी लाभ मिळतात.                    दुध पिणे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आजही कित्येक घरांमध्ये आई-वडील आपल्या मुलांच्या नाश्तामध्ये एक ग्लास दुधाचा सक्तीन समावेश करतात. कारण मुलांचा मेंदू आणि हाडांची योग्य पध्द्तीन वाढ होण्यासाठी दुधातील पोषक घटक उपयुक्त आहेत. साधरणत: शहरी भागामध्ये लोक डेअरीतील दुधाचे सेवन करतात. तर काही जण आपल्या घराशेजारी असणाऱ्या गायीचा गोठ्यातील दुध किंवा दुध विक्रेत्याकडून दुधाची पिशवी विकत घेतात. हे दुध गाय किंवा म्हैशीचे असते. बहुतांश लोकांना गाईचे दुध पिण अधिक पसंत असते. गायीच्या दुधामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात पोषक तत्वांचा पुरवठा होतो. जाणून घेऊया यासंदर्भातील माहिती.  रोगप्रतिकारक शक्ती वाढते :-  आयुर्वेदामध्ये दुधाला अतिशय महत्त्व आहे. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी गायीचे दुध पिणे फायदेशीर मानले जाते. वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, ...

निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स....

Image
  आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण इतके व्यस्त आहोत की, आपण आपल्या आरोग्याची मुळीच काळजी घेऊ शकत नाही, ज्यामुळे आपलयाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. काहीवेळा आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्यास असमर्थ होतो.ज्यामुळे आपल्याला बऱ्याच रोग आणि त्रासांना सामोरे जावे लागते.  निरोगी मन फक्त निरोगी शरीरातच असते...ही म्हण जुनी आहे, पण ती अगदी खरी आहे. तसे, जर आपण आपल्या दैनदिन जीवनात काही गोष्टींंचा समावेश केला आणि काही नियमांचे पालन केले, तर आपण स्वतःस अधिक सहजपणे फिट ठेवू शकतो. यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आपण आज जाणून घेऊया. निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी टिप्स :-  १) खूप पाणी प्या.   एक म्हण आहे की पाणी म्हणजे जीवन आहे, ही योग्य म्हण आहे, म्हणून आपण सर्वात आधी या विषयाची सुरुवात पाण्यापासून करू. दिवसातील जास्तीत जास्त पाणी पिणे हे एका फिटनेस माणसाचे सर्वात मोठे रहस्य आहे.   कारण दिवसात आपण जे काही काम करतो, त्यात आपण आपली बरीच उर्जा खर्च करतो,पाण्यामुळे काही प्रमाणात आपण ती भरून काढू शकतो, म्हणून सकाळी उठल्याबरोबर आपल्याला २ ते ३ ग्लास पाणी पिण्या...

केसांना नियमित तेल लावण्याने होणारे लाभ

Image
   केसांना तेल लावण्यापूर्वी ते किंचित गरम करावे व कोमट तेलाने केसांना मसाज करावा.  तेलात बोटंं घालून, हाताने केसांचे भाग पाडून घ्या व टाळूवर हलक्या हाताने तेल लावा. केसांवर तेल थापून ठेवू नका. गरजेपुरते तेल हातावर घेऊन टाळूवर मसाज करा. जास्त तेल म्हणजे ते काढण्यासाठी जास्त शाम्पू लागेल.  तेल लावताना केस तळव्यांंवर घेऊन चोळू नका. यामुळे केस तुटण्याची शक्यता असते. टाळूवर १०-१५ मिनिटे मसाज करावा, यामुळे रक्तप्रवाह सुधारतो.  रात्रभर केसांवर तेल राहू द्या. जास्त वेळ तेल केसांवर राहणे चांगले असले तरीही २४ तासांपेक्षा अधिक काळ  ठेवू नये. त्यामुळे घाण जमून केस दुबळे होण्याची शक्यता असते.  गरम टॉवेलने केसांना वाफ देणे हा एक उत्तम मार्ग आहे. यामुळे केसांमध्ये तेलाचे योग्यरित्या शोषण होते. मात्र १० मिनिटांपेक्षा अधिक वेळ टॉवेल केसांवर ठेवू नये.  किमान आठवड्यातून एकदा केसांना तेल अवश्य लावावे.  ज्ञानतंतूचे बल, इच्छापूर्ती स्नायू आणि अवयवांची शक्ती वाढते. दृष्टी सुधारते, गाल आणि डोळे यांस बलप्राप्ती होते.  शिरोरोग आणि मज्जारोग यांवर उपयुक्त आहे. डोक...