रोज सकाळी तोंड न धुता गूळ आणि गरम पाणी पाण्याचे हे आहेत फायदे.....
गूळ हा शरीरासाठी चांगला असतो. साखरेच्या तुलनेत गूळ हा नैसर्गिक असल्याने तो खाण्याचा सल्ला दिला जातो.
सकाळी उठताच अनेक लोकांना चहा पिण्याची सवय असते. मात्र तुम्हाला माहित आहे का ही सवय तुमच्या आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकते. सकाळी उठल्यानंतर तोंड न धुता तुम्ही चहाऐवजी गूळ आणि गरम पाणी प्यायलात तर याचे आरोग्यास अगणित फायदे होतील. आयुर्वेदामध्ये याचे महत्त्व महत्त्व सांगण्यात आले आहे. आयुर्वेदामध्ये अनेकाविध आजारांचे नैसर्गिक पद्धतीने उपाय सांगण्यात आले आहेत. जर तुम्ही गोड पदार्थ खाण्याचे शौकीन आहात तर तुम्हाला गुळाबाबत चांगलीच माहिती असेल. दररोज सकाळी तोंड न धुता गूळ आणि गरम पाण्याचे सेव्म केले तर शरीरामध्ये एनर्जी येते. याशिवाय याचे अनेक फायदेही मिळतात. जाणून घेऊया याचे फायदे.
सकाळी तोंड न धुता गूळ आणि गरम पाणी पिण्याचे फायदे
१. रक्त साफ होण्यास मदत :- गूळ खाल्ल्याने शरीरातील रक्त साफ होण्यास मदत होते. गूळाच्या सेवनाने शरीरात नवे रक्त तयार होते. हृदयाशी संबंधित आजार दूर होतात.
३. पाचनक्षमता वाढते :- ज्यांना जेवण जेवल्यानंतर ते पचण्यास अडथळा निर्माण होतो अशा व्यक्तींना नियमितपणे गूळाचे सेवन केलेच पाहिजे. यामुळे बद्धकोष्ठता, गॅॅस, अॅॅसिडीटीच्या समस्या दूर होतात.
४. ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये राहते :- गूळ ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्याचे काम करते. ज्यांना हाय ब्लड पप्रेशरची समस्या आहे त्यांना दररोज गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. गुळामध्ये मोठ्या प्रमाणात कॅॅल्शियम आणि फॉस्फरस असते. ही दोन्ही पोषकतत्वे हाडे मजबूत ठेवण्यास मदत होते. गूळासोबत आले खाल्ल्याने सांधेदुखी त्रास दूर होण्यास मदत होते.

Comments
Post a Comment