आरोग्य चांगले राहण्यासाठी काय करावे दैनंदिन जेवणात स्निग्ध पदार्थ, खनिज इत्यादी घटक तत्वांनी युक्त सकस व संतुलीत नियमित पुरेसा आणि ताजा आहार व्यक्तीला मिळाल्यास आरोग्य लाभते. आहारावर आरोग्य विषयक स्थिती अवलंबून असते. व्यक्तीच्या खाण्यापिण्यामध्ये स्वच्छता, स्वच्छते मुळे आरोग्याला पोषक स्थिती निर्माण होते. अस्वस्थतेमधून मलेरिया, गास्ट्रो इत्यादी सारखे रोग उद्भवतात. वैयक्तिक व सार्वजनिक पातळीवर व्यक्तीने स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. ज्यामुळे आरोग्य चांगले राहते. मनोरंजनातून व्यक्तीला आनंद मिळतो, मानसिक स्वास्थ लाभते. जीवन सुखी समाधानी बनते. व्यक्ती जेव्हा उदासीन बनतो. तेव्हा तो मनोरंजनाचा आधार घेतो. सूयोग्य मनोरंजनामुळे व्यक्तीला शारीरिक, मानसिक स्वास्थ लाभते.
व्यायामामुळे व्यक्तीला आपला आरोग्यविषयक दर्जा उंचावता येतो. नियमित व सुयोग्य व्यायाम असल्यास निरोगी, दिर्घकालीन, सुदृढ, आरोग्य लाभते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. व्यायामाबरोबरच विश्रांती ही तेवढीच महत्त्वाची आहे. आरोग्य आणि विश्रांती या दोन्ही प्रक्रिया अंतरिक सहसंबंध आहे. व्यक्तीचे शरीर म्हणजे यंत्र नव्हे.विशिष्ट काळापर्यंत व्यक्ती एखादे काम करू शकते. पुन्हा तिला थकवा येतो. तेव्हा विश्रांती गरजेची असते. योग्य प्रसंगी चांगल्या प्रकारची विश्रांती कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते. साधारणपणे व्यक्ती दोन प्रकारचे कार्य करते. बैठ्या स्वरूपाची आणि बौद्धिक स्वरुपाची काही कामे फारशी शारीरिक ताण न पडता व्यक्तीला करावी लागतात. काही कामे व्यक्तीला प्रत्यक्ष शारीरिक कष्ट करून आपली शक्ती उर्जा खर्च करून करावी लागतात. उदा. शेतमजूर, हमाल, कारखान्यातील कामगार इत्यादी व्यक्ती शारीरिक कष्टाची कामे करतात. नोकरी करत असताना मानसिक समाधान असणे अत्यंत गरजेचे आहे. मानसिक स्थिती व कामावरील वातावरण याचा देखील आरोग्यावर परिणाम होत असतो. म्हणून आनंदी वातावरणात काम केल्याने उत्साह वाढतो. व कार्यक्षमता सुद्धा वाढण्यास मदत होते.
सभोवतालच्या परिस्थितीचा परिणाम आरोग्यावर होतो. व्यक्तीच्या कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, सामाजिक स्थिती समतोलाची राहू शकेल असे पर्यावरण लाभल्यास आरोग्याचा दर्जा उंचावतो. अशा प्रकारे व्यक्तीचे आरोग्य जपण्यासाठी किंवा व्यक्तीच्या आरोग्यासाठी वरील घटक महत्त्वपूर्ण असतात. जर व्यक्तीस आरोग्याने साथ दिली तर त्या व्यक्तीस ते काम करण्यास सांगेल. ते काम करता येणार नाही. शरीर व मन निरोगी असणे ही व्यक्तीच्या दृष्टीने चांगले समजले जाते. कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय उपचार न घेता व्यक्ती आपले जीवन जगतात. तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने सर्व बाबतींमध्ये श्रीमंत असते. ज्या व्यक्तीजवळ खूप पैसा आहे व त्यास रोगाने जर जर केले तर अशा व्यक्तीस जीवन जगणे कठीण जाते एखादी व्यक्ती जर निरोगी असेल तर संपूर्ण समाज सुद्धा निरोगी असावा लागतो. पण सर्व समाजामधील माणसे हे या ना त्या रोगाने आजारी पडलेले असतात. त्यामुळेच देशाच्या सर्वांगीण प्रगतीवर यांचा परिणाम पडतो. आरोग्य बिघडू नये म्हणून काळजी घेणे हे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. दैनंदिन जीवनामध्ये आरोग्याला विशेष महत्व आहे व आपण त्याची काळजी घेतली पाहिजे.
Comments
Post a Comment